व्यवसायाला दिशा देणारे अध्यात्म — उद्योजकांसाठी नवा दृष्टिकोन
Atul Thakur29 Jun 20261 min read
उद्योजकाला फक्त व्यवसाय चालवायचा नसतो…
त्याला स्वतःलाही सांभाळायचे असते.
दररोज निर्णय... दररोज ताण... दररोज स्पर्धा... दररोज अनिश्चितता...
अशा परिस्थितीत केवळ व्यवस्थापन पुरेसे नसते.
आत्मिक व्यवस्थापन (Spiritual Management) ही आजची गरज आहे.
आध्यात्म म्हणजे व्यवसाय सोडून हिमालयात जाणे नाही.
आध्यात्म म्हणजे—
स्वतःला ओळखणे.
स्वतःच्या विचारांवर नियंत्रण ठेवणे.
अहंकाराऐवजी विवेकाने निर्णय घेणे.
यशात नम्र राहणे आणि अपयशात स्थिर राहणे.
याच कारणासाठी गेल्या काही महिन्यांपासून आपल्या Zoom सत्रांमध्ये अनेक उद्योजक नियमित सहभागी होत आहेत.
कोणी सांगते की राग कमी झाला.
कोणी सांगते की कुटुंबाशी संवाद सुधारला.
कोणी सांगते की व्यवसायातील निर्णय अधिक स्पष्ट झाले.
कोणी म्हणते की आता दिवसाची सुरुवात शांत मनाने होते.
व्यवसाय वाढवण्यासाठी फक्त नवीन तंत्रज्ञान पुरेसे नसते.
नवीन मनही तयार करावे लागते.
आणि मन घडवण्यासाठी आपल्या संतांनी दिलेला अमूल्य वारसा आजही तितकाच उपयुक्त आहे.
म्हणूनच ३० जूनपासून आपण एका नवीन प्रवासाला सुरुवात करत आहोत—
"पसायदान आणि जीवन"
दररोज Zoom वर काही मिनिटे...
ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रत्येक ओवीचा आधुनिक जीवन, नेतृत्व, व्यवसाय, नातेसंबंध आणि अंतर्मनाशी संबंध समजून घेण्याचा प्रयत्न.
हे धार्मिक प्रवचन नाही.
ही स्वतःला अधिक सक्षम, शांत आणि प्रभावी बनवण्याची साधना आहे.
जर व्यवसाय मोठा करायचा असेल तर आधी व्यक्तिमत्त्व मोठे करावे लागते.
आणि व्यक्तिमत्त्वाची खरी उंची अध्यात्मातूनच निर्माण होते.
चला…
३० जूनपासून रोज काही मिनिटे स्वतःसाठी देऊया.
कारण बदल व्यवसायात करण्यापूर्वी...
बदल स्वतःमध्ये घडवावा लागतो.
– अतुल ठाकूर
Life Catalyst Private Limited
Be the first to react
Comments
Loading comments…
Newsletter
Get new posts in your inbox
No spam. Unsubscribe anytime.